आयोजक:
अखिल आगरी समाज परिषद
अखिल आगरी समाज परिषद अध्यक्ष:
मा.श्री.दि.बा.पाटील साहेब.
संमेलनाध्यक्ष:
मा.श्री.रामशेठ ठाकूर.
स्थळ:
खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळील भव्य मैदान(पनवेल)
कार्यक्रम रूपरेषा:
उद्घाटन: केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता.
खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता.
अखिल आगरी समाज परिषद
अखिल आगरी समाज परिषद अध्यक्ष:
मा.श्री.दि.बा.पाटील साहेब.
संमेलनाध्यक्ष:
मा.श्री.रामशेठ ठाकूर.
स्थळ:
खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळील भव्य मैदान(पनवेल)
कार्यक्रम रूपरेषा:
उद्घाटन: केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता.
खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता.
मान्यवर:
उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी, आ. छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, खासदार संजीव नाईक, खा. संजय दिना पाटील, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आ. जयंत पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. विवेक पाटील, आ. मीनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चलो पनवेल....!!
राज्याच्या लोकसंख्येत ५५ ते ६० लाख आगरी समाज बांधवांची संख्या असून आगरी समाजाचे संघटन अधिक व्यापक आणि प्रभावी करून त्या संघटित ताकदीच्या बळावर समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने तसेच आगरी समाजाचे मुंबई व नवी मुंबई शहराच्या निर्मितीमध्ये असलेले भरीव योगदान याची शासनाला खर्या अर्थाने ओळख पटवून देण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे येत्या २३ आणि २४ डिसेंबर रोजी आगरी समाजाचे सातवे महाअधिवेशन खांदेश्वर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे . या महाअधिवेशनाचे उद्घाटन २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते तर २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे . या दोन्ही समारंभाचे अध्यक्षस्थान प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा परिषदचे अध्यक्ष माजी खासदार दि .बा .पाटील भूषविणार आहेत.
आगरी समाज बांधवाच्या नव्या पिढीसमोर भविष्यात उद्भवणारी संकटे, समस्या, आगरी बोलीभाषा, समाजातील बदलते लोकजीवन, शासकीय स्तरावर समाजाचे प्रलंबित असलेले प्रश्न, आगरी साहित्य, आगरी लग्नसमारंभ त्यातील धवला(लग्नगीते), आगरी शिक्षणसंस्था, कर्तृत्ववान आगरी माणसं, साहित्यिक, उद्योजक, गुणवंत प्रतिभावान विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्रीगण, महिला, युवक, समाजसेवी संस्था, आर्थिक पतसंस्था, सहकारी संस्था, प्रगतशील शेतकरी आणि कलाकार, पत्रकार या समाजातील सर्व घटकांची वीण घट्ट बांधून आगरी समाज संघटन व्यापक करण्याच्या उद्दिष्टाने हे सातवे महाअधिवेशन आयोजित केले आहे. मुंबईची ६२ गावे, नवी मुंबईची ९५ गावातील शेतजमिनी व मिठागरे आगरी समाज बांधवांची होती. शासन व खाजगी कंपन्या मालकी आता इथे प्रस्तापित झालीय. समाजाच्या साडेबारा टक्के भूखंड, शासनदरबारी नोकर्या, मच्छीमारांचे प्रश्न व इतर समाजाशी निगडीत अनेक प्रश्नांवर चर्चा, परिसंवाद होणार असून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल.
अखिल आगरी समाज परिषद आगरी समाजाची मध्यवर्ती संघटना असून १९५९ पासून आजवर या परिषदेतर्फे निरनिराळ्या ठिकाणी एकूण सहा अधिवेशन घेण्यात आली आहेत . आता सातवे महाअधिवेशन पनवेल येथील खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळील भव्य मैदानात होत आहे .
या अधिवेशनात क्रीडा , सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच समाजातील विविध प्रश्नांचा सविस्तर परामर्श घेऊन ते सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील . यात प्रामुख्याने आगरी समाजातील हळदी - साखरपुड्यांवरील अमर्याद खर्चासारख्या अनिष्ट रूढी बंद करून इतर चांगल्या रुढी - परंपरा टिकविण्याच्यादृष्टीने अधिवेशनात सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे . तसेच एखाद्याच्या स्वर्गवासानंतर असणारा १३ दिवसांचा दुखवटा कमी करणे , प्रकल्पग्रस्तांनी पुर्नवसनासाठी मिळालेल्या पैशांचा योग्यप्रकारे विनियोग करणे , शेती - मिठागरे - रेती काढणे तसेच मच्छीमारीही बंद झाल्याने भूमीहिन शेतकऱ्यांना शेतकरी दाखल मिळण्यासाठी विशेषत्वाने या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.
समाज संघटन अधिक व्यापक व प्रभावी करून त्या ताकदीच्या बळावर समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने अखिल आगरी समाज परिषदेतर्फे येत्या 23-24 डिसेंबर रोजी 7 वे महाअधिवेशन पनवेल येथे भरवले आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते व परिषदेचे अध्यक्ष दि. बा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या दोनदिवसीय महाअधिवेशनाचे उद्घाटन 23 तारखेला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होईल. यावेळी उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, खा. संजय दिना पाटील, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आ. प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
24 तारखेला दुपारी 4 वाजता खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होईल. या वेळी माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहतील. त्याच दिवशी महिलांच्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन होईल. सायंकाळी समाजातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या अधिवेशनामध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच समाजातील विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील. या महाअधिवेशनाला सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
आगरी समाज बांधवाच्या नव्या पिढीसमोर भविष्यात उद्भवणारी संकटे, समस्या, आगरी बोलीभाषा, समाजातील बदलते लोकजीवन, शासकीय स्तरावर समाजाचे प्रलंबित असलेले प्रश्न, आगरी साहित्य, आगरी लग्नसमारंभ त्यातील धवला(लग्नगीते), आगरी शिक्षणसंस्था, कर्तृत्ववान आगरी माणसं, साहित्यिक, उद्योजक, गुणवंत प्रतिभावान विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्रीगण, महिला, युवक, समाजसेवी संस्था, आर्थिक पतसंस्था, सहकारी संस्था, प्रगतशील शेतकरी आणि कलाकार, पत्रकार या समाजातील सर्व घटकांची वीण घट्ट बांधून आगरी समाज संघटन व्यापक करण्याच्या उद्दिष्टाने हे सातवे महाअधिवेशन आयोजित केले आहे. मुंबईची ६२ गावे, नवी मुंबईची ९५ गावातील शेतजमिनी व मिठागरे आगरी समाज बांधवांची होती. शासन व खाजगी कंपन्या मालकी आता इथे प्रस्तापित झालीय. समाजाच्या साडेबारा टक्के भूखंड, शासनदरबारी नोकर्या, मच्छीमारांचे प्रश्न व इतर समाजाशी निगडीत अनेक प्रश्नांवर चर्चा, परिसंवाद होणार असून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल.
अखिल आगरी समाज परिषद आगरी समाजाची मध्यवर्ती संघटना असून १९५९ पासून आजवर या परिषदेतर्फे निरनिराळ्या ठिकाणी एकूण सहा अधिवेशन घेण्यात आली आहेत . आता सातवे महाअधिवेशन पनवेल येथील खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळील भव्य मैदानात होत आहे .
या अधिवेशनात क्रीडा , सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच समाजातील विविध प्रश्नांचा सविस्तर परामर्श घेऊन ते सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील . यात प्रामुख्याने आगरी समाजातील हळदी - साखरपुड्यांवरील अमर्याद खर्चासारख्या अनिष्ट रूढी बंद करून इतर चांगल्या रुढी - परंपरा टिकविण्याच्यादृष्टीने अधिवेशनात सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे . तसेच एखाद्याच्या स्वर्गवासानंतर असणारा १३ दिवसांचा दुखवटा कमी करणे , प्रकल्पग्रस्तांनी पुर्नवसनासाठी मिळालेल्या पैशांचा योग्यप्रकारे विनियोग करणे , शेती - मिठागरे - रेती काढणे तसेच मच्छीमारीही बंद झाल्याने भूमीहिन शेतकऱ्यांना शेतकरी दाखल मिळण्यासाठी विशेषत्वाने या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.
समाज संघटन अधिक व्यापक व प्रभावी करून त्या ताकदीच्या बळावर समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने अखिल आगरी समाज परिषदेतर्फे येत्या 23-24 डिसेंबर रोजी 7 वे महाअधिवेशन पनवेल येथे भरवले आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते व परिषदेचे अध्यक्ष दि. बा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या दोनदिवसीय महाअधिवेशनाचे उद्घाटन 23 तारखेला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होईल. यावेळी उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, खा. संजय दिना पाटील, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आ. प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
24 तारखेला दुपारी 4 वाजता खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होईल. या वेळी माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहतील. त्याच दिवशी महिलांच्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन होईल. सायंकाळी समाजातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या अधिवेशनामध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच समाजातील विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील. या महाअधिवेशनाला सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा